Friday, January 28, 2011

3 सागरेश्वर निर्मितीचे अनुभव धों. म. मोहिते यांच्याच शब्दात .......




"ते तुम्ही मंत्री असा, पण पास दाखविल्याशिवाय मी तुम्हाला आत सोडणार नाही !" गेटमनने  निर्वाणीचे सांगून आमचे तोंड बंद केले!

                       १९७० सालातील मार्च महिन्य्च्या १९ तारखेची गोष्ट. शाशानाच्या प्रसिद्धी विभागाने पच्छिम महाराष्ट्रातील काही मोजक्या पत्रकारांचा दौरा विदर्भ पाहणीसाठी आयोजित केला होता. किर्लोस्कर मासिकाचा प्रतिनिधी म्हणून माझीही वर्णी त्यात लागली होती. खरे तर दौरा दैनिकांच्या प्रतिनिधींसाठी होता. स्पेशल केस ने संपादकांनी मला त्या दौर्यात घुसडले होते.विदर्भातील विकास कामे, प्रेक्षणीय स्थळे,धार्मिक ठिकाणे  पादाक्रांत करीत आमचा दौरा मजल दरमजल करीत कूच करत होता. आता आम्ही नागपूरपासून ११० मैलांवरील चांद जिल्ह्यातील ताडोबा जंगलाच्या वेळ वाटेला लागलो होतो.त्या काळी मैल होते. अजून किलोमीटर पटलावर यायचे होते.ताडोबा जंगलाचे राष्ट्रीय उद्यान तसेच चांदा जिल्ह्याचे चंद्रपूर असे नामकरण झालेले नव्हते.
                       वेळ रात्रीची. फाल्गुन महिन्याच्या शुक्ला पक्षातील द्वादशी. टिपूर चांदणे पडलेले. धरतीमाता चांदण्यात न्हाहून निघत होती. आमची लक्झरी बस वेग सांभाळून धावत होती. गाडीत शिरणारी वारयाची थंडगार झुळूक शरीराला महारून टाकत होती. पंतीकडे आमचे लक्ष होते कुठे? आम्ही म्हणजे पी ती आय चे कुमार जोशी, प्रभात चे चंद्रकांत दीक्षित, म टा चे सुधाकर अनवलीकर आणि मी असे चौघेजण आपण हिरो आहोत नि गाडीत दंग करण्याचे अधिकारपत्र आपणास देण्यात आले आहे, सरकारचा तसा खास 'जी आर ' आहे, अशा थाटात वावरत होतो. चुटके सांगत होतो. गाणी म्हणत होतो. दाफाडी रस्त्यात विकत घेतलेली वाजवत होतो. आणि ती अवाढव्य लक्झरी बस अक्षरशः डोक्यावर घेत होतो ! थोडक्यात भरपूर वाह्यातपणा  करत होतो. वसंतराव काणे, वसंतराव भोसले, हि 'वसंतराव' मंडळी  आणि तत्सम वडीलधारी पत्रकार मानाडली पुरती वैतागून गेली.
                     रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास एके ठिकाणी बस थांबली. ड्रायव्हरने हेंडलायीट विझवून इंजिन बंद केले. तो खाली उतरला. आम्ही समोर पाहिले ते गेट दिसले. ते बंद होते. आगगाडी आली वाटते ? एव्हाना पुण्याचे जिल्हा प्रसिद्धी अधिकारी मधुकर चावरे हेही बसमधून खाली उतरले. त्यांची नि गेटमनची काही वादावादी चालू झाल्याचे आमच्या कानावर आले. म्हणून आम्ही चौघेजण गाडीबाहेर आलो. समोर पाहतो ते नुसतेच गेट! रेल्वे रूळ नाही नि काही नाही! गेटवर खाकी गणवेषातील गेटमन होता. तो गेट उघडीत नव्हता. आम्हाला कळेना हे काय प्रकरण आहे ? चौकशीअंती समजले की, इथून ताडोबा जंगल सुरु होते. सडकेला हद्दीवर गेट आहे. ताडोबा जंगलात यायला वन खात्याचा पास लागतो. तो नागपुरात मुख्य कार्यालयात मिळतो इथे येणाऱ्या प्रत्येकाचा पास पाहून आणि नोंदवहीत तशी नोंद करून मगच गेटमन गेट उघडून आत प्रवेश देतो.

No comments:

Post a Comment