एखादा मनुष्य एवढा निसर्गवेडा असू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही . उघड्या बोडक्या टेकड्यांचे हिरव्याकंच पर्यटनस्थळात रुपांतर करण्याचा ध्यास घेऊन आपल्या आयुष्यातील तब्बल २४ वर्षे त्यांनी याकरीता वाहिली.
सह्याद्रीची उतरंड पूर्वपदावर आणण्यासाठी अथक परिश्रम करणारी 'मोहिते ' हि एक वैशिष्टपूर्ण वल्ली आहे . चिकाटी आणि निर्धाराने लालफितीच्या कारभाराविरुद्ध त्यांनी दिलेला लढा,
आयुष्यातल्या चढ उतारांशी दिलेली झुंज अशी ही एक सुरस कहाणी !सागरेश्वरच्या डोंगरावर अभयारण्याचे कष्टप्रद काम डोंगराशी झुंज देऊन मोठ्या जिद्दीने तडीस नेणारे वृक्षमित्र धो. म. मोहिते यांचे आत्मकथन . कार्यकर्ता कसा घडतो , मनात आणले तर तो काय करू शकतो याचे यथार्थ चित्र या ब्लॉग मध्ये उमटलेले दिसेल .सुंदर निसर्ग परमेश्वरच निर्माण करतो असे म्हणतात. परंतु मानवी प्रयत्नाने व जिद्दीने काय निर्माण होऊ शकते , याचा प्रत्यय सागरेश्वर अभयारण्य बघितल्यावर येतो . कल्पने पेक्षाही कितीतरी रम्य निसर्ग येथे दिमाखाने उभा आहे .
No comments:
Post a Comment