Friday, January 28, 2011

3 सागरेश्वर निर्मितीचे अनुभव धों. म. मोहिते यांच्याच शब्दात .......




"ते तुम्ही मंत्री असा, पण पास दाखविल्याशिवाय मी तुम्हाला आत सोडणार नाही !" गेटमनने  निर्वाणीचे सांगून आमचे तोंड बंद केले!

                       १९७० सालातील मार्च महिन्य्च्या १९ तारखेची गोष्ट. शाशानाच्या प्रसिद्धी विभागाने पच्छिम महाराष्ट्रातील काही मोजक्या पत्रकारांचा दौरा विदर्भ पाहणीसाठी आयोजित केला होता. किर्लोस्कर मासिकाचा प्रतिनिधी म्हणून माझीही वर्णी त्यात लागली होती. खरे तर दौरा दैनिकांच्या प्रतिनिधींसाठी होता. स्पेशल केस ने संपादकांनी मला त्या दौर्यात घुसडले होते.विदर्भातील विकास कामे, प्रेक्षणीय स्थळे,धार्मिक ठिकाणे  पादाक्रांत करीत आमचा दौरा मजल दरमजल करीत कूच करत होता. आता आम्ही नागपूरपासून ११० मैलांवरील चांद जिल्ह्यातील ताडोबा जंगलाच्या वेळ वाटेला लागलो होतो.त्या काळी मैल होते. अजून किलोमीटर पटलावर यायचे होते.ताडोबा जंगलाचे राष्ट्रीय उद्यान तसेच चांदा जिल्ह्याचे चंद्रपूर असे नामकरण झालेले नव्हते.
                       वेळ रात्रीची. फाल्गुन महिन्याच्या शुक्ला पक्षातील द्वादशी. टिपूर चांदणे पडलेले. धरतीमाता चांदण्यात न्हाहून निघत होती. आमची लक्झरी बस वेग सांभाळून धावत होती. गाडीत शिरणारी वारयाची थंडगार झुळूक शरीराला महारून टाकत होती. पंतीकडे आमचे लक्ष होते कुठे? आम्ही म्हणजे पी ती आय चे कुमार जोशी, प्रभात चे चंद्रकांत दीक्षित, म टा चे सुधाकर अनवलीकर आणि मी असे चौघेजण आपण हिरो आहोत नि गाडीत दंग करण्याचे अधिकारपत्र आपणास देण्यात आले आहे, सरकारचा तसा खास 'जी आर ' आहे, अशा थाटात वावरत होतो. चुटके सांगत होतो. गाणी म्हणत होतो. दाफाडी रस्त्यात विकत घेतलेली वाजवत होतो. आणि ती अवाढव्य लक्झरी बस अक्षरशः डोक्यावर घेत होतो ! थोडक्यात भरपूर वाह्यातपणा  करत होतो. वसंतराव काणे, वसंतराव भोसले, हि 'वसंतराव' मंडळी  आणि तत्सम वडीलधारी पत्रकार मानाडली पुरती वैतागून गेली.
                     रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास एके ठिकाणी बस थांबली. ड्रायव्हरने हेंडलायीट विझवून इंजिन बंद केले. तो खाली उतरला. आम्ही समोर पाहिले ते गेट दिसले. ते बंद होते. आगगाडी आली वाटते ? एव्हाना पुण्याचे जिल्हा प्रसिद्धी अधिकारी मधुकर चावरे हेही बसमधून खाली उतरले. त्यांची नि गेटमनची काही वादावादी चालू झाल्याचे आमच्या कानावर आले. म्हणून आम्ही चौघेजण गाडीबाहेर आलो. समोर पाहतो ते नुसतेच गेट! रेल्वे रूळ नाही नि काही नाही! गेटवर खाकी गणवेषातील गेटमन होता. तो गेट उघडीत नव्हता. आम्हाला कळेना हे काय प्रकरण आहे ? चौकशीअंती समजले की, इथून ताडोबा जंगल सुरु होते. सडकेला हद्दीवर गेट आहे. ताडोबा जंगलात यायला वन खात्याचा पास लागतो. तो नागपुरात मुख्य कार्यालयात मिळतो इथे येणाऱ्या प्रत्येकाचा पास पाहून आणि नोंदवहीत तशी नोंद करून मगच गेटमन गेट उघडून आत प्रवेश देतो.

Thursday, January 27, 2011

2




ठीक ११ वाजून ५९ मिनिटांनी ललकारी, तुतारी,बॅंडच्या,निनादात राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी अशोक हॉलमध्ये प्रवेश केला. सर्वजन उठुंन  उभे राहिले आणि राष्ट्रपती व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यावर खाली बसले. राष्ट्रपतींच्या उजव्या बाजूला वनमंत्री आणि डाव्या बाजूला वनसचिव बसले. हॉल मध्ये शांतता पसरली. 
सुरवातीला वनमंत्र्यांनी सर्वांचे स्वागत करून  पुरस्काराचे  प्रयोजन सांगितले. पुरस्कार वितरणाला सुरवात झाली. आण्णांचे (धो. म. मोहिते ) नाव  पुकारताच ते व्यासपिठासमोरील छोट्या चौकोनी आकाराच्या गालीच्या कडे रुबाबात चालत निघाले. गालीच्या वर उभे  राहून त्यांनी राष्ट्रपतींना वाकून अभिवादन केले. आणि आण्णांना हा पुरस्कार का दिला जातोय, याची माहिती निवेदिका माईक  वरून देऊ लागली.


"स्वतंत्रता सेनानी,कर्मठ सामाजिक कार्यकर्त्ता तथा वनीकरण एव वन्यजीव संरक्षण के पुनीत कार्य में सफलतापूर्वक जन - जन को जागरुक बनाने वाले श्री.धोंडीराम  महादेव मोहिते ने महाराष्ट्र के सांगली जिले में 'सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य' के निर्माण में प्रमुख भूमिका निभाई  है  ! श्री  मोहिते ने 'सागरेश्वर अभयारण्य' के विकास के लिए १९७० से १९८३ के दौरान जन मानस को जुटाया जिसकी सफल परिणिति १९८३ में १०८७ हेक्टर क्षेत्र में अभयारण्य की स्थापना और उसकी अधिसूचित करने के साथ हुई ! श्री मोहिते के अथक प्रयासों के फल स्वरुप अभयारण्य की परिस्थिती में सुधार हुआ ! उनके द्वारा किये गए उत्कृष्ट कर्योंकी की राज्य सरकार, विश्व प्रकृति निधि तथा वनीकरण व संरक्षण कार्य में लगे अन्य संगठनोने भूरि - भूरि प्रशंशा की  है !
"पर्यावरण प्रदुषण के नियंत्रण , वनीकरण एव उसके संरक्षण की आवश्यकता के प्रति आम जागरूकता उत्पन  करने के लिए  श्री मोहिते ने ९९ अध्ययन दौरे,विचार-गाष्ठिया , कार्यशालाएं तथा व्याख्यान आयोजित किये और लघु स्तरीय संस्था ओ  की स्थापना  की  जिनमे अध्यापको, चिकिस्तको, इंजीनियरों, पत्रकारों, बच्चो, आदि को शामिल किया गया !१९८७ में उन्होंने 'वृक्ष दिंडी' नामक कार्यक्रम शुरू किया जिसका उदेश पोधे वितरण करना, वृक्षारोपण कार्यक्रमों व बिज बैंक तैयार करने के लिए मार्गदर्शन करना था ! यह कार्यक्रम सांगली जिले में अज भी लोकप्रिय है ! श्री मोहिते द्वारा जागरूकता बढाने कि दिशा में किये गये प्रयत्नों से ग्राम समाज तथा शैक्षणिक संस्थाओ के वनीकरण प्रयासों को बढ़ावा मिला है ! धोंडीराम महादेव मोहिते.......सांगली......महाराष्ट्र!"

1





६ ऑगस्ट १९९४ ! राजधानी दिल्ली राष्ट्रपती भवनातील अशोक हॉल निमंत्रितांच्या उपस्थितीने खचाखच भरला होता . भारत सरकारच्या वनमन्त्रालयाने आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यासाठी मान्यवरांची तेथे हजेरी होती. त्यामध्ये लोकसभचे सभापती, अनेक केंद्रीय मंत्री ,खासदार, नेते मंडळी, वरिष्ट अधिकारी आदी मान्यवरांचा समावेश होता . वन व्रुधीचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,संस्था,यांना राष्ट्रपतींच्या हस्ते आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार  होते. इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार,इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार, प्रदूषण नियंत्रण राष्ट्रीय पुरस्कार असे हे तीन पुरस्कार होते. त्यासाठी भारताच्या कानाकोपरातून निवडण्यात आलेल्या व्यक्ती आणि सेवाभावी संस्थाचा एकून आकडा सोळा होता. इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कारासाठी व्यक्तिगत श्रेणीत निवड झालेले भारतातील धो. म. मोहिते हे एकमेव कार्यकर्ते होते. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, आणि ५० हजार रुपये असे या  पुरस्काराचे स्वरूप होते.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र श्री धो.म.मोहिते.



मनापासुन शुभेच्छा !


Wednesday, January 19, 2011

अभयारण्य निर्मितीला मान्यवरांच्या मिळालेल्या प्रतिक्रिया.....

"व्हेरी गुड! आपने देश का बहुत बडा काम किया है.
                                       - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी (१९/४/१९८१)

"विधायक कार्यकर्ता आणि शासनयंत्रणा यांच्या कर्तुत्वाचा सुरेख संगम म्हणजे हे सागरेश्वर अभयारण्य"
                                                                                           - यशवंतराव चव्हाण  (१९/३/१९८०)

"I am happy to find that there are people like you in Maharashtra who are genuinely interested in the preservation of its flora and fauna". 
                                           - Ex. Governor of Maharashtra I.H.Latif  (11/6/1983)

"राजेश्री धो.म.मोहिते यांच्यावर हि महाराष्ट्र भूमी आणि महाराष्ट्राची भाग्यभवानी सदैव प्रसन्न राहील".
                                                                                                            - बाबासाहेब पुरंदरे                             

"ज्यांची हृदये झाडांची, त्यानांच फक्त फुले येतात तेच वाढतात प्रकाश पितात, तेच ऋतू झेलतात".
                                                                                                            - मंगेश पाडगावकर

Saturday, January 8, 2011

दृष्टीक्षेप

सागरेश्वर पठारापासून चार कि. मी. वरच्या मोहित्यांचे वडगाव इथले धो.म.मोहिते एक शेतकरी ,स्वातंत्र्याच्या दोन दशकात, सह्याद्रीवरील उरली सुरली झाडे  झुडपे भूईसपाट झालेली 'याची देही याची डोळा पाहणारे श्री मोहिते हेही एक साक्षीदार. विविध कारणास्तव हिरव्या संपत्तीचा केलेला मुक्त विध्वंस पाहून व्यथित झालेल्या त्यांनी एक अद्भुत स्वप्न बाळगले . 
                                एखादा मनुष्य एवढा निसर्गवेडा असू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही . उघड्या बोडक्या टेकड्यांचे हिरव्याकंच पर्यटनस्थळात रुपांतर करण्याचा ध्यास घेऊन आपल्या आयुष्यातील तब्बल २४ वर्षे त्यांनी याकरीता वाहिली.
                                 सह्याद्रीची उतरंड पूर्वपदावर आणण्यासाठी  अथक परिश्रम करणारी 'मोहिते ' हि एक वैशिष्टपूर्ण वल्ली आहे . चिकाटी आणि निर्धाराने लालफितीच्या कारभाराविरुद्ध त्यांनी दिलेला लढा,
आयुष्यातल्या चढ उतारांशी दिलेली झुंज अशी ही एक सुरस कहाणी !
                                  सागरेश्वरच्या  डोंगरावर अभयारण्याचे कष्टप्रद काम डोंगराशी झुंज देऊन मोठ्या जिद्दीने तडीस नेणारे वृक्षमित्र धो. म. मोहिते यांचे आत्मकथन . कार्यकर्ता कसा घडतो , मनात आणले तर तो काय करू शकतो याचे यथार्थ चित्र   या ब्लॉग मध्ये उमटलेले दिसेल .सुंदर निसर्ग परमेश्वरच निर्माण करतो असे म्हणतात. परंतु मानवी प्रयत्नाने व  जिद्दीने काय निर्माण होऊ शकते , याचा प्रत्यय सागरेश्वर  अभयारण्य बघितल्यावर येतो . कल्पने पेक्षाही कितीतरी रम्य निसर्ग येथे दिमाखाने उभा आहे .